पुणे – सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीत कंटेनरने महिलेला चिरडले; जागीच मृत्यू

0
997
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे- सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारा वरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पुढे चालत असलेल्या दुचाकीला पाठी मागुन जोराची धडक दिल्याने त्यावरील पाठीमागे बसलेल्या महिला महामार्गावर पडली. त्यांच्या डोक्यावरून कंटेनरची चाके गेल्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुर्गा विजय जाधव वय ३८ असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विजय जाधव (वय ४३) आणी त्यांची पत्नी दुर्गा विजय जाधव (वय ३८ दोघेही रा. ऊपळी पोस्ट करंदी तालुका जिल्हा सातारा) हे दोघेजण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे येथुन पुणे सातारा महमार्गावरुन सातारा जिल्ह्यातील ऊपळी या आपल्या मुळ गावी जाण्या साठी आपल्या मालकीच्या दुचाकी वरुन निघाले होते सायंकाळी. ४ वाजुन १५ मिनिटांनी त्यांची दुचाकी वेळे गावच्या हद्दीत असणार्या खंबाटकी घाटाचा तिव्र असणारा उतार उतरत असताना ते वेळे गावच्या हद्दीत आले. त्यावेळी त्यांच्यापाठी मागुन खंबाटकी घाट उतरून भरघाव वेगात येणाऱ्या कंटेनरने पाठी मागुन जोराची धडक दिली. धडकेमुळे दुचाकी वर बसलेल्या सौ.दुर्गा जाधव या महामार्गावर पडल्या त्या वेळी कंटेनर चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने कंटेनरची चाके त्यांच्या डोक्या वरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आपल्या समोरच आपल्या पत्नीचा अशा भयानक पध्दतीने झालेला मृत्यू पाहुन पती विजय जाधव यांनी एकच हंबरडा फोडला. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघाताचे दृश्य पाहून इतर वाहन चालकांच्याही डोळ्यात पाणी येत होते.