दहावीच्या परीक्षेत मिळवले 100% गुण; अदितीचा खा. श्रीनिवास पाटलांनी केला सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.

पाटण तालुक्यातील हावळेवाडी गावातील अदिती मनोज हावळे हिने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते अदिती व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. पाटील म्हणाले, सर्व सामान्य कुटुंबातील अदितीने मिळवलेले यश कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ शिक्षणचं परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. त्यातून स्वतःचे व समाजाचे परिवर्तन होऊन प्रगती होते. काळानुरुप शिक्षणाचे स्वरूप बदलत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असणे गरजे आहे. शिक्षणाबद्दल पालकांच्यात सुद्धा जागृती झाली असून आपल्या मुलाच्या शिक्षणाकरिता ते अपार कष्ट उपसत आहेत.

आई-वडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे जाणीव ठेऊन मुलांनी स्वताला अभ्यासात झोकून द्यावे. शिक्षणाचा बदलता ट्रेंड लक्षात घेऊन तसे शिक्षण आत्मसात करावे. त्यासाठी लागणारी अतिरिक्त कौशल्य देखील शिकावीत. बाह्य स्पर्धेसाठी तयार होऊन आत्मविश्वासाने सामोरे जावे. जिद्द, मेहनत, सराव केल्याने यश नक्कीच मिळते, असे खासदार पाटील यांनी म्हंटले. यावेळी मनोज हावळे व रेश्मा हावळे उपस्थित होत्या.