शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कृषी विभागाकडून अन्नधान्य, कडधान्यसह 11 पिकासाठी पीक स्पर्धचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कृषि विभागामार्फत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकासाठी पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे.

पीक स्पर्धेतील पिके – खरीप पिके भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल (एकूण ११ पिके). स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर (०.२०हे) व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (०.४० हे) आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागद पत्रे पुढीलप्रमाणे असतील, विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इ. खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील.

स्पर्धेत ‘असे’ आकारले जाणार शुल्क

मूग व उडीद अंतिम तारीख ३१ जुलै २०२४, भात. ख ज्वारी, बाजरी मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल ३१ ऑगस्ट २०२४ तसेच अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्कपीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु ३०० राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु १५० राहील.

अशी असणार बक्षिसे

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये तालुका पातळी पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे बक्षिस 3 हजार रुपये, तिसरे बक्षीस 2 हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रुपये, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये, राज्य पातळी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये, तिसरे बक्षीस 30 हजार रुपये, असे बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत.

शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे : भाग्यश्री फरांदे

दुय्यम तसेच पौष्टिक तृण धान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे पीक स्पर्धे बाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट दयावी तसेच खालील QR कोड स्कॅन करावा, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.