मुसळधार पावसामुळे बळीराजाला खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता; दुबार पेरणीचे संकट

0
251
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असल्यामुळे शेतात चिखल निर्माण झाला आहे. दरम्यान, कराड तालुकयातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रब्बीची पिके डोळ्यादेखत अक्षरशः शेतातच कुजून गेली. तर शेतातील मशागतीची कामेही खोळंबली आहेत. ज्या ठिकाणी पेरणी झाली तेथील पिके पाण्याने पिवळी पडू लागली आहेत.

सातारा जिल्यास अजून चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळनंतर मुसळधार पावसाळा सुरुवात होत आहे. सततच्या पावसामुळे शेतीतील पिकांना फटका बसला असून, विशेषत: ऊस, टोमॅटो या तालुक्यातील प्रमुख पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. याशिवाय, टोमॅटो, वांगी, मिरची,कांदा यासारख्या भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ आणि किडींचा प्रादूर्भाव वाढल्याने उत्पादनात 40 ते 50 टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. सतत पडणार्‍या या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. उसाच्या मुळांना पाणी साचल्याने पिकेn कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. भात पिके पिवळी पडत चालली आहेत. तसेच, भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ आणि फळांचा सडा यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे.

ज्या शेतकर्‍यांची शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली होती, त्यांनी हा वळीव पाऊस थांबेल या विचाराने सुरुवातीच्या काळात पेरणी करून घेतली. पण वळीवाच्या पावसाबरोबरच मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने शेतात पाणी साचून राहिले असल्याने पेरलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून दुबार पेरणीची भीती व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाकडे पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी सरकारकडे तात्काळ आर्थिक मदत आणि कर्जमाफीची मागणी केली आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.