‘माझ्याशी भांडणाऱ्यासोबत का फिरतो’ म्हणत ‘त्या’ चौघांनी केली तरुणास मारहाण, पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात किरकोळ वादावाडीतून मारहाणीपर्यंत गेल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. अशीही एक घटना मंगळवार पेठेतील ढोणे काॅलनी परिसरात घडली. यावेळी ‘तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस?, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत, असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज मुरारी (पूर्ण नाव नाही रा. पाॅवर हाउस झोपडपट्टी, सातारा), बाॅबी देवकर (पूर्ण नाव नाही. मोरे काॅलनी, शाहूपुरी, सातारा), धीरज जयसिंग ढाणे (रा. ढोणे काॅलनी, सातारा) आणि अनोळखी युवक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील मंगळवार पेठमध्ये राहत असलेल्या संदीप भरत पवार याने तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. १२ जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मंगळवार पेठेतील ढोणे काॅलनीत मारहाणीचा प्रकार घडला.

तक्रारदार संदीप पवार याला संशयित युवराज मुरारी याने “आकाश नलवडे याच्याबरोबर का फिरतो? त्याने काल माझ्यासोबत भांडणे केली आहेत,” असे म्हणत फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. तसेच इतर तिघांकडूनही लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी तक्रारदाराच्या पँटच्या खिशातून दीड हजार रुपये काढून घेण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी चाैघांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.