Satara Waterfall : पावसाळ्यात फिरायला जाताय? जिल्ह्यातील ‘या’ खास पर्यंटनस्थळांना नक्की भेट द्या !

0
439
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात (Satara Tourism) अनेक पर्यंटनस्थळे आहेत. मे महिन्यापासूनच मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. आता जून महिन्यात प्रत्यक्ष मान्सून दाखल झाला असून गेल्या दहा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळी ओसाड डोंगरावर हिरवा शालू पांघरला आहे. अशा या पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शानवैर आणिरविवार सुट्टी दिवशी अनेकजण वन डे ट्रिपचा प्लॅन करत आहेत. तुम्हीही असाच फिरण्याचा प्लॅन करत असाल तर पाटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील काही अशी ठिकाणी आहेत कि त्याठिकाणी तुम्हाला मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी पर्यटनस्थळे आहेत. हुंबरळी (पाटण), धारेश्वर , कास, सज्जनगड/ठोसेघर आणि टेबललॅँड/पाचगणी अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत कि तिथे तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो.

1) हुंबरळी (पाटण) (Humbarli)-

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगरपासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर हुंबरळी (Humbarli) हे एका उंच टेकाडावर वसलेलं गाव. या ठिकाणाहून आपल्याला हिरव्यागार वनराईत लपलेल्या कोयना जलाशयाचे विहंगमय दृश्य दिसते. सध्या या ठिकाणी जंगल सफारी बरोबरच कोयना जलाशयात नौकाविहाराचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. या ठिकाणी राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह (एमटीडीसी) काही खासगी रिसॉटही आहे. हुंबरळीला जाण्यासाठी सातारा किंवा कराड येथून पाटणला यावे लागते. यानंतर पाटणपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयना या गावी यावे लागते. कोयनेपासून ३ किलोमीटर अंतरावर हुंबरळी हे गाव आहे.

2) धारेश्वर (Dhareshwar Waterfall)-

धारेश्वर हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाटण पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर सातारा येथून 80 किलोमीटर अंतरावर आहे. धारेवश्वर डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. तसेच एक मठ व भक्तांसाठी निर्माण केले खोल्या आहेत. हा डोंगर अर्धवर्तुळाकार असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतो. येथे महादेवाची मोठी पिंड व नक्षीकाम केलेल्या शिळा आहेत येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे मन प्रसन्न करून टाकतात. येथे येणाऱ्यांना राहण्यासाठी पाटण शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी सोय आहे. याठिकाणी स्वताःची गाडी असणे आवश्यक आहे.

3) ओझर्डे धबधबा (Ozerde Waterfall) –

पाटण तालुक्यातील ओझर्डे धबधबा कोयना धरणाजवळ आहे. कोयना धरणाच्या बाजूने नवजा कडे जाताना ओझर्डे धबधबा 800 फुटावरून कोसळतो. कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा धबधबा येतो. त्यामुळे येथे वनविभागाने सुरक्षितेचे उपाययोजना केलेल्या आहेत. या ठिकाणाहून कोयना धरणाचा शिवसागर जलाशय पाहता येतो. तसेच पंडित जवाहलाल नेहरू उद्यानही येथेच काही अंतरावर आहे. या धबधब्याला भेट देण्यासाठी सातारा येथून उंब्रज मार्गे- मल्हारपेठ- पाटण- कोयनानगर- अोझर्डे असे जाता येते. एसटी बस कोयनानगर पर्यंत जाते. कोयनानगर येथे शासकीय निवासस्थाने तसेच हाॅटेल्स, रिसाॅर्ट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

4) वजराई भांबवली धबधबा (Vajrai Bhambvali Waterfall)-

आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ‘भांबवली वजराई’ हा धबधबा ओळखला जातो. मुख्य म्हणजे, हा धबधबा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. प्रसिद्ध कास तलावापासून पुढे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे अत्यंत सुंदर आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे विहंगम दृष्य पहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील ‘भांबवली वजराई’ या धबधब्याची उंची तब्बल १ हजार ८४० फूट इतकी आहे. शिवाय हा धबधबा अत्यंत घनदाट जंगलात असल्याने त्याच्या आसपासचा परिसर फारच सुंदर आहे. देशातील सर्वात उंच असा हा धबधबा उरमोडी नदीत उगम पावतो.

5) ठोसेघर धबधबा (Toseghar Waterfall)-

आज आपण ज्या ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत, ते ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा. ठोसेघर धबधबा हा राजधानी सातारापासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर तुम्हाला १४१ किलोमीटर अंतर कापावे लागेल. तसेच मुंबईतून येणार असाल तर २९४ किलोमीटर अंतर कापावे लागेल. एका छोट्याशा गावातील हा धबधबा अत्यंत नयनरम्य आहे. हा धबधबा शांत वातावरण आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देता येते. खास करून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.

6) एकिव धबधबा (Ekiv WaterFall)-

एकिव धबधबा कास रोडवर पारंबो फाट्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावरील पडणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून वाहते. धबधबा लहान असून कुटुंबातील व्यक्ती सोबत मनसोक्त भेटण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. धबधबा अतिशय सुरक्षित आहे. कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हा धबधबा आपल्या कुटुंबासोबत हमखास पहावा असा आहे. सातारा शहरातून बामणोलीला जाणाऱ्या एसटी बसने किंवा खासगी वडापने तसेच स्वतः च्या चारचाकी, दुचाकीने तुम्ही या ठिकाणाला भेट देवू शकता. येथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे. येथे आल्यानंतर अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आहेत. कास पठार, बामणोली, वासोटा किल्ला, यवतेश्वर, वजराई धबधबा आदी.