जिल्ह्यात एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे दुष्काळी माण, खटावमधील 39 गावे 357 वाड्यांना 49 टँकरचे पाणी

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर, परिसरासह जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह कोसळलेल्‍या मॉन्सूनपूर्व सरींचे धुमशान पाहायला मिळाले. साताऱ्यात सकाळी आणि सायंकाळी, तर फलटण, जावळी, खटाव, माण, कराड तालुक्‍यांत सायंकाळी झालेल्‍या या पावसाने शेतीमालासह अन्‍य नुकसानीचे संकटही निर्माण झाले. अशा पावसाच्या हजेरीतही सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भाग असलेल्या दुष्काळी माण-खटाव मध्ये 39 गावे 357 वाड्यांना 49 खाजगी पिण्याच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 14 खासगी विहिरी व सहा हातपंप शासनाने आदी ग्रहण केले आहेत. सातारा जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अथक प्रयत्नाने पाणीटंचाई कक्षाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना तातडीने पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या दहिवडी व शिंगणापूर भागातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी जाधववाडी, वडगाव, मोगराळे, तोंडले आणि मोही डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी सोकासन, शेवरी, धुळदेव, वरकुटे, म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, पिंगळी बु, मार्डी, खुटबाव पर्यंती, इंजबाव भालवडी, पानवण, विरळी, वारुगड, कुळकजाई, शिरवली, सत्रेवाडी, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बु, महिमानगड, सुरुपखानवाडी,पांढरवाडी, कुकुडवाड, दोरगेवाडी, बुध, औंध, का. खटाव, मायणी, निमसोड मांजरवाडी, नवलेवाडी, मोळ, जायगाव करांडेवाडी, एनकुळ, डांभेवाडी, तडवळे दातेवाडी, अनफळे, खातवळ, धौडेवाडी कामथी पुसेगाव, कटगुण, उंबरमळे, कातळगेवाडी, कलेढोण, कान्हरवाडी खटाव, जाखणगाव या ठिकाणी व परिसरात शासनाने टँकरने पाणीपुरवठा केल्यामुळे अनेकांची तहान भागत आहे. दुष्काळ नाहीसा व्हावा. अशी सर्वांचे प्रामाणिकपणे इच्छा आहे. त्या दृष्टीने मार्गक्रमण होत असताना काही जण इव्हेंट म्हणून त्याच्याकडे पाहत आहे.

माण खटावच्या दुष्काळाबाबत मोठ्या प्रमाणात पाणी जिरवा.. पाणी मिळवा.. याचा आरंभ दिवंगत माजी आमदार धोंडीराम वाघमारे आणि महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये झालेला होता. यामध्ये तात्कालीन आमदार म्हणून जयकुमार गोरे यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्याचे स्मरण अनेकांना आहे. परंतु, सध्या इव्हेंट करून पाणी आल्याचे दाखवून दिले जात असले तरी दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील पाणी बघून अनेकांना मानवता भावनेतून त्या प्रसंगाकडे पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे. आंधळी धरणातून रानंद तलावापर्यंत 22 किलोमीटरच पाईपलाईन टाकून 32 गावच्या दुष्काळ ग्रस्तांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली.