सातारा जिल्ह्यात 3 दिवसीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन

0
473
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पौष्टिक तृणधान्य महोत्सव हा तृणधान्यांचे महत्त्व आणि त्यांचे पोषक तत्वे जाणून घेण्यासाठी आयोजित केला जातो. या महोत्सवातून तृणधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. राज्य शासन कृषि विभागामार्फत सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी देखील अशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचा सातारा शहर वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

पौष्टीक तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास मधुमेह, बध्दकोष्ठता, आतड्याच्या आजारास प्रतिबंध होतो. तसेच तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, ह्यदयविकार, अॅनिमिया, उच्च रक्तदाब रोधक मानले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. थेट शेतक-यांच्या शेतातून ताजे व स्वच्छ अन्नधान्य खरेदीची संधी सातारकरांना मिळणार आहे.

माणची बाजरी तर कराडची नाचणी घेता येणार…

पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये माण, खंडाळा येथील देशी बाजरी, सातारा, खटावची देशी ज्वारी ,कराडची नाचणी, जावळी, पाटणचा देशी इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मुग, कोरेगाव चा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे तसेच पोष्टिक तृणधान्यांपासुन तयार केलेले प्रक्रिया पदार्थ इ. वैशिष्ट्य पुर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.