जादा परताव्याच्या आमिषाने 5 जणांना 30 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. महिन्यात एखादी दर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते हे नक्की. अशीच एक टँकर कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात असल्याची घटना कराड शहरात घडली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल साधमियाँ कादरी (रा. राजकोट, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील मंगळवार पेठ येथील रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांनी ११ जुलै ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कादरी याच्या कंपनीत ३० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. पैशांची गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षात ज्यादा परताव्यासह रक्कम परत देण्याचे आश्वासन साहिलने दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांनी पैशाची मागणी सुरू केली.

त्यावेळी साहिलने उडवाउडवीची उत्तर देत मोबाइल बंद केला. त्यानंतर काही महिने तो फरार होता. काही दिवसांपूर्वी रामगोंडा व त्यांच्या मित्रांचा साहिल याच्याशी संपर्क झाला. त्यावेळी त्याने मी कोणतीही रक्कम देणार नाही, मला फोन करून पैसे मागितल्यास तुम्हाला सोडणार नाही. तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रामगोंडा यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.