सातारा प्रतिनिधी । नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. “महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. शिवरायांनी लोकशाहीचा पाया घातला आणि त्यांच्या सैन्यात अनेक समाजाचे मावळे आणि मुस्लिमही होते, असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले. नमूद केले.
खा. उदयनराजे भोसले यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नागपूरमधील हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्यात बदल करून कडक कारवाई करण्याची गरज आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला आणि लोकशाहीचा ढाचा रचला, त्यामुळे त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व होते की, ज्यांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला. लोकशहीचा ढाचा रचण्याच काम शिवाजी महाराज यांनी केलं. त्यामुळं त्यांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी, भाजप पक्षाने शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणण्याच काम केलं, एक व्यक्ती म्हणून मी हे सांगतो नागपूरच्या दंगलीच कोणीच समर्थन करू शकत नाही. सर्वधर्म समभावचे विचार देशाला पुढे घेवून जातात. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा शाशन मान्य असणारा इतिहास प्रकाशित करावा म्हणजे वाद होणार नाही.
द्वेष पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं
द्वेष पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं आहे. द्वेष त्यांनी पेरला आहे. मी आज भाजप म्हणून उत्तर देत नाही. देशाचा एक नागरिक म्हणून मी उत्तर देत आहे. शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा घटक म्हणून मी बोलत आहे. समाज एकत्र ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आमदार, खासदार सगळ्यांची ही जबाबदारी आहे. औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं. इथे येउन मंदिरांची तोडफोड केली, नासधूस केली. इथला सामाजिक सलोखा बिघडवला. त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करणे योग्य नाही. नितेश राणे यांच्यावर बोलताना त्यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केलं असेल. सध्या राजीनामा मागणे ही फॅशन झाली असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
दंगल घडवून आणणारे कुठल्या पक्षाचे नसतात : खा. उदयनराजे भोसले
फडणवीस यांची औरंगजेबशी तुलना हे हास्यास्पद आहे. ज्याने अशी तुलना केली त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडल असेल. त्याच्या चेकअपची गरज आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल क्रूर हा शब्द वापरला आहे. क्रूर असते तर फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच नसते. दंगल घडवून आणणारे कुठल्या पक्षाचे नसतात. पोलिसांना सहकार्य करण्याचं काम समाजाने करणे गरजेचं आहे, अशी मागणी खा. उदयनराजे यांनी केली आहे.