माजी मुख्यमंत्री पृथ्वीराबाबांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत झाला ‘हा’ महत्वाचा निर्णय; आता प्रत्येक तालुक्यात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दृष्टीने सातारा जिल्हा काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत बूथ, मंडळ आणि ग्राम समिती स्थापन करण्यासाठी सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी (निरीक्षक) नियुक्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली.

सातारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीत पक्षाची बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, ज्येष्ठ नेते अॅड. विजयराव कणसे, बाबासाहेब कदम, अजित पाटील-चिखलीकर, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. विश्वंभर बाबर, निवास थोरात, रजनी पवार, राहुल चव्हाण, अमित जाधव, प्राची ताकतोडे, विद्या थोरवडे, नीलम येडगे, छायादेवी घोरपडे, गिंताजली थोरात, रफिक बागवान आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘तालुकास्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आहे. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी, मंडळ कमिटी आणि ग्राम समित्या एक महिन्याच्या आत स्थापन कराव्यात. ज्यांच्यावर प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी जबाबदारीच्या तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात बैठका घेऊन समित्या स्थापन कराव्यात.

दरम्यान, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने मागील दहा दिवसांत पक्ष संघटना वाढीसाठी तीन बैठका घेतल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी पायाभरणी सुरू केलेली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून पक्ष मजबूतीसाठी लक्ष घातल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.