सोडचिठ्ठी देणार म्हंटल्यावर बायकोनं असं मारलं की नवऱ्यानं गाठलं पोलीस स्टेशन; पुढं घडलंअसं काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लग्न झाल्यानंतर काही कारणांनी नवरा आणि बायकोत भांडणे होतात. भांडणे अगदी टोकापर्यंत पोहचल्यानंतर तो विषय सोडचिठ्ठी पर्यंतही जातो. अशा घटना काहींच्या बाबतीत घडतात. अशीच घटना भुईंज परिसरात घडली असून मात्र, सोडचिठ्ठी देतो असे म्हटल्याने नवऱ्याला बायकोने बेदम मारहाण केली आहार. यामध्ये बायकोसह सात जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहार.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील लगडवाडी येथील पतीस मारहाण प्रकरणी पत्नीसह सहा जणांवर भुईंज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २७ रोजी ८:३० वा. ते दि. २८ रोजी ३ वाजण्याच्या सुमारास लगडवाडी ते लोणंद प्रवासा दरम्यान किरण भिलारे, सोमनाथ भिलारे, संभाजी भिलारे, सोन्या (पूर्ण नाव माहीत नाही), गणेश भिलारे, प्रथमेश भिलारे, नीलम घाडगे रा. लोणंद यांनी जबरदस्तीने घरात घुसून शुभम घाडगे (फिर्यादी) यांची पत्नीने पटत नसल्याने सोडचिठ्ठी देयच्याआधी दुसरे लग्न करतोयस का? असे म्हणून नवऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

गिझरने, कुऱ्हाडीचा तुंब्याने जबर मारहाण करून घरामधून बाहेर आणून ईरटीका गाडीमध्ये बसवून शिरगाव गावचा घाटातील घाटमाथ्यावर नेऊन तेथे असलेल्या हॉटेलच्या समोर गाडी उभी करून पुन्हा मारहाण केली. तसेच नवऱ्याला दारू देखील पाजली आणि वाठार मार्गे लोणंद येथील मेहुण्याच्या घरी नेऊन त्या ठिकाणी पुन्हा लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर लोकांनी नवऱ्याशी मध्यरात्री ३ वाजता लोणंद येथील बस स्थानकात नेऊन सोडले तेथून ते सर्व जण निघून गेले. म्हणून त्या सात जणांचा विरोधात फिर्यादी याने भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोहवा दगडे करत आहेत.