जोरदार पावसामुळे कास तलाव ओसंडला; पर्यटकांची गर्दी, तलावाच्या भिंतीवरून वाहू लागले पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पावसाचा जोर वाढल्यामुळे सातारा शहरातील काही भागाची तहान भागवणारा कास तलाव शनिवारी ओसंडून वाहू लागला. कास तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले असून तलावात आता ०.००५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे. तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे तलाव परिसराकडे पर्यटकही गदीं कर लागले आहेत.

कास तलावाची १२.४२ मीटर उंची वाढवल्यानंतर काल तलाव प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. सातारा शहराची २०४० पर्यंतची लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन कास – तलावाची उंची वाढवण्यात आली होती. या कामासाठी तब्बल ६० श्रीकोटी रुपये खर्च आला. सातारा शहरासह पठारावरील १५ गावांची तहान हा तलाव भागवतो. कास तलावाची भिंत वाढवण्याबरोबर तलावाच्या पिछाडीला पायऱ्यांचे टप्पे करण्यात आले आहेत.

सततचा पाऊस, धुके, निसर्गरम्य कास वातावरण यामुळे कास तलाव बर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढतच त्यांचे आहे. कास तलाव शनिवारी दुपारी हेत. साडेबारा वाजता ओव्हर फ्लो

झाला. तीनच दिवसांपूर्वी कास तलावामध्ये ५६ फूट पाणीसाठा झाला होता. शनिवारी पावसाचा तलाव जोर कायम राहिल्याने कास तलाव जोर भरून वाहू लागला. तलाव परिसर घळीप्रमाणे असल्यामुळे डोंगरातील ओहोळांचे पाणी खळखळून – तलावांमध्ये येत आहे. पावसाचा – जोर कायम असल्यामुळे धरण ओसंडून वाहिले आहे