ग्रामपंचायत निवडणुकीतील ‘या’ उमेदवारांना 30 नोव्हेंबर अखेर जाहिरनामा सादर करण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यामध्ये राखीव जागेवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी समितीकडे ऑक्टोंबर 2023 मध्ये अर्ज सादर केलेले आहेत. सदर अर्जावर संबंधित निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत किंवा कसे याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची समितीने छाननी केल्यानंतर उमेदवार हे आरक्षित (मागासप्रवर्ग) जागेवर निवडून आले नसल्याचे आढळून आले. तसेच संबंधितानी जाहीरनामा या कार्यालयाकडे सादर केला नसल्यामुळे त्यांनी उमेदवारांनी जाहिरनामा दि. 30 नोव्हेंबर 2023 अखेर समितीस सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन उबाळे यांनी केले आहे.

याबाबत उबाळे यांनी म्हंटले आहे की, सर्व प्राप्त अर्जापैकी अद्याप निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा समितीस सादर न केल्यामुळे सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र व त्यांच्या पडताळणीचे नियम 2012 मधील नियम 17 (2) / (3) मधील तरतुदीनुसार निकाली काढण्यात येतील. याची सर्व निवडणुकीमध्ये सहभागी उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

सर्व संबंधित उमेदवारांनी आपले प्रकरणी विहित कालमर्यादेत जात पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने दि. 30 नोव्हेंबर 2023 अखेर आरक्षित (मागासवर्ग) जागेवर निवडून आल्याबाबतचा जाहिरनामा या कार्यालयास सादर करावा. तरी या संबंधित अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी निवडणुकीमध्ये राखीव जागेवरती निवडून आल्याबाबतचा जाहिरनामा दि. 30 नोव्हेंबर 2023 अखेर समितीस सादर करावेत, असे आवाहन उबाळे यांनी केले आहे.