सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनो शेतीसारा भरा; तहसीलदार नागेश गायकवाड यांचे आवाहन

0
197
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी, बिनशेती भूखंडधारक यांनी आपल्या शेतीचा, बिनशेती भूखंडाचा शेती सारा -दरवर्षी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे भरणे आवश्यक असते. तथापि सातारा तालुक्यातील बऱ्याच शेतकरी, भूखंड धारक यांनी अदयापी त्यांचा शेतसारा भरलेला नाही. तरी 25 मार्च २०२५ पूर्वी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे जमा करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.

शेतसारा म्हणजे, जमिनीवर लावला जाणारा एक कर आहे. हा कर नाणे, पैसे किंवा धान्याच्या स्वरूपात शासनाला द्यावा लागतो. शेतसारा भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. मुदतीत शेतसारा, बिनशेती कर जमा न केलेस संबंधित खातेदार यांचे 7/12 वरती थकित शेतसारा बिनशेती कर वसुल होणेवर ” असा बोजा चढविणेत येईल.

त्यामुळे संबंधितास बँक कर्ज, दस्त नोंदणी अशा अनेक अडचणीस सामना करावा लागेल, तथापि सदरची बाब टाळणेसाठी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे दि. 25 मार्च 2025 पर्यंत भरणा करावा,असे आवाहन तहसीलदार गायकवाड यांनी केले आहे.