सातारा जिल्ह्यात अजूनही टॅंकर भागवतायत ‘इतक्या’ गावांची तहान

Khatav News 20240817 131445 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात अजूनही पावसाची ओढ आहे. त्यामुळे माण तालुक्यातील १० गावे आणि ५६ वाड्या वस्त्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १८ हजार लोकांची तहान सध्या या टॅंकरवरच अवलंबून आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासूनच टॅंकरची … Read more

जिल्ह्यात मुसळधार पडून देखील 164 ठिकाणी टॅंकर भागवतायत नागरिकांची तहान

Satara News 20240704 090824 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर दोनशेच्या घरात गेलेली टॅंकरची संख्या २४ वर आली आहे. जिल्ह्यात सध्य परिस्थितीत पाच तालुक्यातील ३१ गावे व १३३ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाच्या आगमनानंतर सहा तालुक्यातील पाणी टॅंकर बंद झाले आहेत. दोनशेच्या घरातील टॅंकरची संख्या अवघ्या २४ वर आल्याने प्रशासनावरील … Read more

पाऊस पडताच जिल्ह्यातील 77 गावे अन् 263 वाड्यांतील टॅंकर झाले बंद मात्र, ‘इतक्या’ गावात 148 टॅंकर सुरूच

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात सुरु असलेली टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत पाणी टंचाईची स्थिती असून या गावात १४८ टॅंकरने तहान भागवण्याचे काम सुरु आहे. २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनास टँकरने पाणी … Read more

जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा; 3 लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

Satara News 2024 05 13T141323.067

सातारा प्रतिनिधी | पावसाने ओढ दिल्यामुळे या वर्षीची पाणी टंचाई जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागालाही जाणवत आहे. कराड, पाटण तालुक्यातही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. कराड तालुक्यात 4, तर पाटण तालुक्यातही 9 आणि वाई तालुक्यात 4 टँकर सुरू आहेत. याशिवाय अनेक गावांतून टँकरची मागणी नसली तरी त्या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट आहे. संपूर्ण जिल्ह्यात … Read more

खटाव तालुक्यात टंचाईची दाहकता वाढली; ‘इतक्या’ गावात टँकरने पाणीपुरवठा

Khatav News 20240421 143856 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दुष्काळी खटाव तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. नेर सोडून तालुक्याच्या पूर्व भागातील येरळवाडीसह सर्वच तलाव, धरणे आणि बहुतांश विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. प्रशासनाकडून ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 11 गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवले जात आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत असून पशुपालक मेटाकुटीला … Read more

सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई; ‘इतके’ टँकर भागवतायत नागरिकांची तहान

Satara News 19 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई भीषण होऊ लागल्याने प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढत आहे. सध्या जिल्ह्यात दोन लाख ९४ हजार ४४५ लोकांना १७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात उष्णता वाढल्याने पिण्याच्या पाण्याची अवस्था खूप बिकट बनत चालली असून जिल्ह्यात तब्बल आठ तालुक्यांत … Read more

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील गावकऱ्यांची 142 टॅँकर भागवतायत ‘तहान’

Satara News 20240323 213041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. … Read more