जिल्ह्यातील ‘या’ ग्रामंपचायतीनं पहिल्यांदा घेतलं असा निर्णय कि त्यामुळे दिसली दुष्काळाची दाहकता

Satara News 2024 03 01T181655.368 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आज अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या गावांपैकी एक खातगुण हे गाव होय. या गावात जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली असून गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आल्यामुळे गावच्या ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ चे कलम लागू केले आहे. … Read more

पाणी प्रश्न पेटला… जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी पाण्यासाठी चक्क वाघ्या मुरळीद्वारे जागरण

Vaduj News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळ भाग म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात पाणी प्रशन चांगलाच पेटला आहे. खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळीद्वारे ‘पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची..’ चे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खटाव तालुक्यात सध्या पिण्यासह … Read more

खटाव भागात ज्वारी काढणीला पडतोय मजुरांचा तुटवडा

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यातील खटाव तालुक्यासह कातरखटाव परिसरातील शिवारात ज्वारी काढणीला वेग आला आहे. मात्र, या ठिकाणी मजुराच्या तुटवड्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने पैरा करून रानावनात ज्वारी काढणीची कामे केली जात आहेत. गेली दोन वर्षे झाली अत्यल्प तर काही भागात पावसाने हुलकावणी देत कमी हजेरी लावल्याने मागास … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली ‘ही’ मागणी

Satara News 20240208 122811 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपुजनाला येणार आहेत. माण तालुक्यातील आंधळी धरणातून माणगंगा नदी प्रवाहित केली जाणार आहे. मोदींचे गुरुवर्य इनामदार यांचे मूळ गाव खटाव असून त्यांच्या तालुक्यातून आणि गावातून वाहणारी येरळामाई नदी देखील प्रवाहीत करावी. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी खटाला येण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी … Read more

जिल्ह्यात जगातील सर्वात उंच उडणारा ‘पटेरी हंस’ दाखल, ‘या’ तलावात मिळतायत पहायला

Khatav News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक तलावांमध्ये दरवर्षी हजारो पक्षी येतात. यामध्ये खासकरून हिमालय पर्वत ओलांडून स्थलांतरित करणाऱ्या पक्षांपैकी ‘पट्टेरी हंस’ या पक्ष्याची संख्या जास्त पहायला मिळते. यंदाच्या वर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून खटाव तालुक्यातील मायणी समूह पक्षी संवर्धन असलेल्या येरळवाडी येथील तलावामध्ये दाखल झाला आहे. हा ‘पट्टेरी हंस’ जगातील सर्वात जास्त उंच उडणाऱ्या … Read more

ZP शाळेचा विद्यार्थी अमेय फडतरेची ‘इस्रो’च्या सहलीसाठी निवड

Satara News 26 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून अनेक गोष्टींची मिळावी, हा मुख्य उद्देश सहलीमागचा असतो. येत्या १४ फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) अभ्यास सहलीसाठी जिल्हा परिषद … Read more

जिल्ह्यातील येरळवाडी धरणात परदेशी पाहुण्यांचे आगमन; लेसर फ्लेमिंगो, स्टार्क पक्ष्यांच्या रांगा

Satara News 2024 01 31T185735.832 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्या ठिकाणी परदेशी पक्षी त्यांच्या हंगामात येतात. असेच एक ठिकाण म्हणजे खटाव तालुक्यातील येरळवाडी धरण होय. या ठिकाणी वीस टक्केच मृत पाणीसाठा उरला असताना ऐन गुलाबी थंडीत धरणात लेसर फ्लेमिंगो आणि स्टार्क पक्षी या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या हालचालीमुळे मोठे फ्लेमिंगो (ग्रेटर) पक्ष्यांचे कमी पाण्यात … Read more

जिल्ह्यात पाण्याअभावी गावागावात दुष्काळी परिस्थिती, टँकरने केला जातोय पाणीपुरवठा

Satara News 98 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने ८१ गावे २९१ वाड्यांना ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५ गावे २४१ वाड्यांना ४२ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या … Read more

पुसेगावात 4 वर्षांनंतर खिल्लार जनावरांचा बाजार

Pusegaon News 20240111 132348 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणारा बैल बाजार लम्पी आणि इतर आजारांच्या सावटामुळे चार वर्षे भरला नव्हता. राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुसेगावच्या बैल बाजाराला ७५ वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी येणारे बैल हे उत्कृष्ट दर्जाचे असतात, अशी ख्याती आहे. बाजारात जातिवंत पशुधनाची संख्या उल्लेखनीय असते. त्यामुळे महाराष्ट्रासह … Read more

‘रयत क्रांति’च्या आंदोलनाची दखल; बोंबाळवाडी तलावात पाणी

20240111 122143 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील बोबाळवाडी तलावामध्ये पाणी शिल्लक नसल्याने शामगाव परिसरातील शेतकऱ्यांची पिके वाळत चालली होती. चार दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शामगाव मधील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा प्रकल्प अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता दादा नरवडे यांना निवेदन देत पाणी सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर टेंभू प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी तलावामध्ये … Read more

वडूजला आज पाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

Vaduj News 20240111 115205 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वडुज येथील नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे आज दि. ११ रोजी सायंकाळी 5 वाजता येथील बाजार पटांगणात भूमिपूजन समारंभ होणार आहे. आज होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाजप आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासन पुरस्कृत अमृत २० या योजने अंतर्गत शहराला ४६ कोटी ६७ लाख रूपये खर्चाची पाणी … Read more

रहाटणीत शेतकऱ्याने 40 गुंठ्यात घेतले 129 टन उसाचे उत्पन्न

20240108 180020 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील रहाटणी येथील प्रगतीशील शेतकरी व पोलीस पाटील देवीदास थोरात यांनी ४० गुंठ्यामध्ये १२९ टन एवढे आडसाली लागणी ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. या गावातील सर्वांत जास्त उत्पन्न या शेतकऱ्याने काढले आहे. या परिसरातील गावाना उरमोडी पोटपाटाच्या पाण्याचे वरदान लाभले आहे. यामुळे या परिसरात पाण्याची कमतरता पडत नाही. तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने … Read more