फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडी सरकार येईल; शरद पवारांचे महत्वाचे विधान

Satara News 20240907 100251 0000

सातारा प्रतिनिधी | फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून खटाव-माणचे चित्र बदलेल. येथील सर्व पाणी योजना पूर्णपणे मार्गी लावतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामविकासाचा दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखांमधून आम्ही पुढे नेला, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. निढळ, ता. खटाव येथील हनुमान विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर … Read more

ऐन पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील 6 गावे अन् 22 वाड्या तहानलेल्याच

Satara News 20240902 112518 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी 6 गावे व 22 वाड्यांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. गावांमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पाणीपुरवठा विभागामार्फत 7 टँकरनी टंचाईग्रस्त गावांची तहान भागवली जात आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे 218 वर टँकरची संख्या पोहोचली होती. मे महिन्याच्या शेवटच्या … Read more

सातारा जिल्ह्यात अजूनही टॅंकर भागवतायत ‘इतक्या’ गावांची तहान

Khatav News 20240817 131445 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात अजूनही पावसाची ओढ आहे. त्यामुळे माण तालुक्यातील १० गावे आणि ५६ वाड्या वस्त्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १८ हजार लोकांची तहान सध्या या टॅंकरवरच अवलंबून आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासूनच टॅंकरची … Read more

अटल भूजल योजनेचे केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात; खटाव तालुक्यातील ‘या’ गावाला दिली भेट

Khatav News 20240817 122128 0000

सातारा प्रतिनिधी | अटल भूजल योजने अंतर्गत खटाव तालुक्यातील येणाऱ्या निढळ गावांमध्ये अटल जलराष्ट्रीय व्यवस्थापन कक्षाचे डायरेक्ट अँड ओ एस डी सेक्रेटरी डॉ. राघव लांगर, डायरेक्टर राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष डॉ. उमेश बालपांडे तसेच कृषी तज्ञ पी. सी कुमावत यांनी गावांमध्ये क्षेत्रीय भेट दिली. यावेळी हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत … Read more

नाग पकडायला गेलेल्या कलेढोणमधील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

Khatav News 1

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कलेढोण येथील तरुण सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर (वय ३२) या युवकाचा नाग चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या आकस्मिक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कलेढोण कुटीर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह नातेवाईकांनी तीव्र संताप केला. याबाबत अधिक माहिती अशी की, विखळे येथील … Read more

‘प्रहार’च्या राज्यव्यापी आंदोलनात माण – खटावचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार : अरविंद पिसे

Karad News 16

सातारा प्रतिनिधी । प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शुक्रवार दि. ९ रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती ‘प्रहार’चे माण खटाव विधानसभा निवडणुकीचे उमेदवार तथा सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ … Read more

जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याची तलावात आवक सुरू; नेर तलाव भरला ‘इतके’ टक्के

Khatav News

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेला व राणी व्हिक्टोरिया यांच्या काळात बांधलेला ब्रिटिशकालीन अर्धा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला नेर तलाव खटाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी संजीवनी ठरणारा आहे. खटावसह गावांची माण तहान भागवणाऱ्या नेर तलावात सध्या ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिहे- कठापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पाण्याची जोरात आवक सुरू झाली … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंवरील आरोप गांभीर्याने घ्या; हायकाेर्टाच्या पोलिसांना सक्त सूचना

Jayakumar Gore News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या गाजत कोरोनाकाळातील एका घोटाळ्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. हि चर्चा सुरु असताना उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपास कार्यावरून ओढलेले ताशेरे हे विचार करायला लावणारे आहे. कोरोनाकाळात २०० पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्याने घ्या, अशी सक्त … Read more

दिव्यांग मेळाव्यातून बच्चू कडूंचा राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले,”तुम्हारी क्या औकाद”

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे रयत आधार सोशल फाउंडेशन व प्रहार जनशक्ती पक्षाचा नुकताच दिव्यांग मेळावा पार पडला. या मेळाव्यातून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी “जिसका कोई नही, उसका प्रहार है यारो”असे गौरवोद्गार काढले. मात्र, लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “शेतकऱ्यांना शेतातील पिकाला चांगला … Read more

बोगस कागदपत्रांद्वारे केली जमीन बिगरशेती; हिंदकेसरी पैलवानासह दोघांना अटक

Crime News 20240710 130659 0000

सातारा प्रतिनिधी | राजाचे कुर्ले, ता. खटाव येथे ग्रामपंचायतीचा बोगस ग्रामसभा ठराव आणि ना हरकत दाखला सादर करून गावातील जमीन बिगरशेती केल्याप्रकरणी हिंदकेसरी – पैलवानासह दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदकेसरी पैलवान संतोष पांडुरंग वेताळ (रा. सुर्ली, ता. कराड जि. सातारा) व आनंदा शंकर मोरे (रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि. सांगली) अशी अटक … Read more

मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Khatav yerla dam News 20240708 121913 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू … Read more

खटाव तालुक्यातील बोंबाळे गावात जुगाराचा मोठा अड्डा, आयोजकांकडून केली जाते जुगाऱ्यांच्या मांसाहारी जेवणाची सोय

Khatav News 20240705 071007 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवैध व्यवसाय फोफावत चालले आहेत. त्याचा प्रत्यय आणून देणारी घटना खटाव तालुक्यातील बोंबाळे गावच्या हद्दीत पाहायला मिळत आहे. बोंबाळे गावाच्या बाहेर जुगाराचा मोठा अड्डा चालत असल्याची बाब एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. या अड्ड्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याने आयोजकांकडून जुगार खेळणाऱ्यांसाठी मांसाहारी जेवणाची खास मेजवानी दिली जात असल्याची माहितीही … Read more