जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केवळ 1500 हेक्टरवरच पेरणी

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळी पिक घेण्याचे प्रमाण कमी झाले असून सुमारे दीड हजार हेक्टरवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जिल्ह्यात केवळ ३२.३० टक्के इतकेच प्रमाण आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्त्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वांत मोठा हंगाम असतो. सुमारे … Read more

जिल्ह्यात ‘या’ नऊ कारखान्यांकडून 9.35 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन

Agriculture News 20240430 170735 0000

सातारा प्रतिनिधी | यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील १७ पैकी ९ कारखान्यांनी ९ कोटी ३५ लाख ४६ हजार लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. राज्यात यंदा उच्चांकी १०९ लाख टनांचे साखर उत्पादन झाले आहे. राज्यामध्ये इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे इथेनॉलची निर्मिती होते. जिल्ह्याचा विचार करता अजिंक्यतारा, सह्याद्री, किसनवीर भुईंज, जरंडेश्वर, स्वराज आणि खटाव-माण या कारखान्यांकडे … Read more

सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे; 8 तालुक्यांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water News 20240403 185013 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात एकूण ११ तालुक्यांची संख्या आहे. या तालुक्यांपैकी ८ तालुक्यांत सद्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १३७ गावे व ४३५ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

जावळीत शेतजमिनीच्या रस्त्यावरून 5 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240403 110940 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेतजमिनीत रस्ता खुला करण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी जावळी तालुका धनकवडी येथील पाच जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील धनकवडी येथील जमीन गट नं. ५०/८ या क्षेत्रामध्ये जाणे – येणेकरिता रस्ता खुला करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यानुसार मेढा … Read more

अन् पाणी प्रश्नासाठी सुरु केलेले उपोषण पुसेसावळीतील ग्रामस्थांनी घेतले मागे

Pusesavali News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह परिसरात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पुसेसावळी ग्रामस्थांनी वडूज येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, प्रशासनाच्या लेखी व सकारात्मक आश्वासनानंतर एका दिवसात हे उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या निर्णयानंतर या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जनावराच्या पिण्याचा व चाऱ्याचा उपलब्धतेसाठी … Read more

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : डॉ. पी. जी. पाटील

20240324 104339 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बोरगाव, ता. सातारा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठक (दि. 22) उत्साहात पार पडली. बैठकीत “आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंधारणावर भर द्यावा,” असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी … Read more

कराड तालुक्यात ऊस लागवड क्षेत्र ‘इतक्या’ टक्क्यांनी घटणार; 44 पाझर तलाव आटले

Karad News 79 jpg

कराड प्रतिनिधी । यंदा कृष्णा व आरफळ कालव्याला पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांची होरपळ सुरू आहे. शेतीच्या पाण्याची स्थिती बिकट होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून ऊस शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ५९ पाझर तलावांपैकी ४४ पाझर तलाव आटले आहेत. शेतकऱ्यांनी चारा, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग या पिकांचा पर्याय निवडला आहे. शेतीला पुरेसे पाणी मिळणार नसल्याने … Read more

कालव्यातून पाणी उपसा प्रतिबंधासाठी जलसंपदा विभागाचे महत्वाचे आवाहन

Satara News 2024 03 18T182947.453 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात कोरेगाव, माण, खटावसह काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या तालुक्यात समन्यायी पद्धतीने सिंचनासाठी आवश्यक पाणी विसर्ग पोहचण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचे लक्षात घेत सिंचन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे तालुक्यातील कालव्याच्या दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरावर कलम १४४ आदेश लागू … Read more

आरफळ कालव्यातील पाणी प्रश्नी शेतकऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 2024 03 16T181202.463 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा आरफळ कॅनॉल १९९० पासून वाहत आहे. कॅनॉलसाठी कण्हेर धरणातून ३.७५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कराड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली … Read more

तारळीचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत मसूर भागातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Water News jpg

कराड प्रतिनिधी । आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याबाबत व हणबरवाडी – शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आरफळ कालव्यात सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून … Read more

जिल्ह्यात दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्या; ‘स्वाभिमानी’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जनम्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने वाई आणि खंडाळा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक मंडलात दुष्काळ जाहीर केला. मात्र, अजुनही सवलती लागू होत नाहीत. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेरकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले. “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील … Read more

सोनं, पैसे सोडून ‘त्यांनी’ मारला ऊसावर डल्ला; सातारा जिल्ह्यात अनोख्या दरोड्याची चर्चा

Crime News 27 1 jpg

सातारा प्रतिनिधी । आतापर्यंत आपण अज्ञात चोरटे असो किंवा दरोडेखोर यांनी तलवारीचा अथवा कुऱ्हाडीचा धक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याच्या घटना ऐकल्या असतील पण सातारा जिल्ह्यात बोरगाव पोलिस ठाणे हद्दीत एक अनोखी लूटमारीच्या घटना घडली आहे. ती म्हणजे चोरट्याने चक्क कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाक दाखवून दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेल्याची घटना … Read more