मराठा समाजाला न्याय देण्याचं आ. शिवेंद्रराजेनी दिलं फडणवीसांना श्रेय, म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश आल्याचं मानलं जातंय. त्याचं श्रेय साताऱ्यातील भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. अनेक नेते मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यापैकी कोणीही मराठ्यांना न्याय दिला नाही. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यात आधी तो न्याय देवेंद्र फडणवीस यांनी दिला,असे महत्वाचे विधान शिवेंद्रराजेंनी केले आहे.

भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, शेतात काम करणं चुकीचं अथवा कमीपणाचे देखील नाही. मुख्यमंत्री हे शेतकरी आहेत.

त्यामुळे शेतात काम केलं तर त्यात वाईट काय? शेतात काम करून मुंबईला जाऊन त्यांनी आरक्षण दिलं. आता संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानावेत, असा टोला आ. शिवेंद्रराजेंनी खा. राऊत यांना लगावला.