पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत? ‘या’ बॅनरमुळे खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना आता पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा आशयाचे बॅनर झळकल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री देसाई यांचा फोटो असलेले बॅनर भर चौकात लावून त्यावर पालकमंत्री देसाई बेपत्ता असल्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असताना पालकमंत्री मात्र लक्ष देत नसल्याचा आरोप करत मनसेने सदर पोस्टर लावले असल्याचे समजत आहे.

मंत्री शंभूराज देसाई साताऱ्यासोबतच ठाण्याचेही पालकमंत्री आहेत. मीरा-भाईंदरमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना पालकमंत्री व प्रशासन झोपले आहे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पोस्टरद्वारे सरकारला करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मीरी-भाईंदर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावर नागरिक नाराज असल्याचे म्हणत पालकमंत्र्यांचे याकडे का लक्ष नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोसह बॅनरबाजी केली गेल्याने आता राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे तसेच आपण यांना पाहिलात का असाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या फोटोसह आणि नावाने जोरदार बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावरही नागरिक नाराजी व्यक्त करत असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.