आम्ही काय सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन पक्षप्रवेश केलेला नाही; कराडात सत्यजितसिह पाटणकरांचा मंत्री देसाईंना टोला

0
292
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पक्ष प्रवेश करत असताना आम्ही काय सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेलो नाही. आम्ही काय वेगळा प्रवास केलेला नाही. पूर्वीचा पक्ष सोडत असताना आम्ही आमच्या वरिष्ठ मंडळींना सर्व काही सांगून त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतलेला आहे. गेली पस्तीस वर्षे आम्ही एका विचारांशी बांधील होतो. त्यामुळे आमचे पूर्वीचे जेष्ठ नेते नाराज आहेत हे म्हणणे चुकीचे ठरेल, असे सांगत भाजप नेते सत्यजितसिह पाटणकर यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी काल भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आज कराड येथील प्रीतिसंगमावर येऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप पदाधिकारी व पाटणकर गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पाटणकर म्हणाले की, भाजप हा देशातील नंबर एकच पक्ष आहे. पाटण तालुक्यातील जो रखडलेला विकास आहे. शेतकऱ्यांचे, व्याघ्र प्रकल्पाचे, धरणग्रस्त, बेरोजगारीचे जे काही प्रश्न आहेत. हे सर्व सोडवायचे झाले तर एखाद्या मोठ्या पक्षाच्या माध्यमातूनच सोडवावे लागतील ते सोडवण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. १९८३ सालानंतर पाटण तालुक्यात अनेक प्रश्न माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर याच्या माध्यमातून काही विकास झाला. मात्र, गेल्या दहा वर्षात पाटण तालुक्याचा विकास झालेला नाही. आज आपण नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली २५० गावे त्या प्रकल्पात घेतलेले आहे. हा प्रश्न आम्ही भाजपच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करू.

माझा पक्ष प्रवेश जरी मुंबईत प्रवेश झाला असला तरी माझ्या पक्ष प्रवेशाला खुद्द छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित होते आता यापेक्षा अजून काही हवे आहे. पक्षश्रेष्ठी जे काही सांगतील, आदेश देतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करू, आता इथून पुढे ५० वर्षे आम्ही भाजपच्या माध्यमातून विकास करू, असे सत्यजितसिह पाटणकर यांनी म्हंटले.