भाविकांच्या गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण; चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली

0
477
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीत आगमन झाले. त्यानंतर पालखी सोहळा नीरा पुलावर येताच फुलांचा वर्षाव अन् माउली…माउली अशा जयघोषात सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. निरास्नानानंतर हा सोहळा पुढे फलटणमध्ये दाखल झाला. माऊलीचा पालकहो सोहळ्याचे रिंगण चांदोबाचा लिंब येथे दाखल झाल्यानंतर पार पडते. मात्र, यावर्षी या रिंगण सोहळ्याला भाविकांच्या गर्दीने तब्बलवतीं ते चार वेळा जागा पुढे बदलत रिंगण सोहळा कसाबसा पार पाडावा लागला.

माऊलीचा रिंगणसोहळा दरवर्षी पुरातन चांदोबाचा लिंब येथे डाव्या बाजूला पार पडतो. यावर्षी नेहमीच्या जागेवर हे रिंगण देखील लावण्यात आले होते. यासाठी दोन्ही बाजूला पोलिस, स्वयंसेवक व राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संरक्षक दोर लावले होते. मात्र, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नगारखाना पुढे गेल्यानंतर दोन्ही अश्व रिंगण सोहळ्यासाठी तयार झाले. याचवेळी माऊलींची पालखी पुरातन चांदोबाचा लिंब येथे आली. रिंगण सोहळ्यात रथा पुढील सत्तावीस दिंड्या दोन्ही बाजूला उभ्या राहतात. यावर्षी रिंगण सोहळ्यासाठी या दिंड्यांना दुतर्फा उभे राहता आले नाही. त्यातच पाठीमागून येणाऱ्या भाविकांचा लोंढा रिंगण सोहळ्यात सामील झाला.

यामुळे अभूतपूर्व गोंधळात तब्बल तीन वेळा जागा बदलून रिंगण नेहमीच्या ठिकाणा पासून अर्धा किलोमीटर अंतरावर कसेबसे रिंगण लावले याच गर्दीत दोन्ही अश्वांनी वाट काढत त्यांचे कार्य कसेबसे पार पाडले. मात्र रिंगण सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. यामुळे भाविक नाराज झाले. रिंगणाची जागा कोणी बदलली? विश्वस्त व पोलिस यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला असावा तसेच पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे नेहमीच्या जागेवर बंदोबस्त लावला होता, आयत्या वेळी रिंगणाची जागा कोणी बदलली हे समजू शकले नाही. भाविकांची गर्दी व गोंधळ भाविकांची गर्दी बाजूला करण्यासाठी पोलिस अतोनात प्रयत्न करत होते शेवटी विश्वस्त देखील मदतीला आले परंतू गर्दी काही कमी होत नव्हती त्यामुळे पोलिसांना आयत्या वेळी बदल करावा लागला.