संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘या’ दिवशी होणार साताऱ्यात दाखल; 5 दिवस मुक्काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी साताऱ्यात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून आळंदीतून सुरू होणार आहे. तर ११ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रस्थान करत सोहळा पंढरपूरला जातो. दि. ६ जुलै रोजी पालखी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात लोणंद प्रवेश करणार आहे. रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. तर दि. ७ रोजीही लोणंद येथेच मुक्काम असेल. तर दि. ८ जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन पालखी लोणंद येथून मार्गस्थ हेाईल.

दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब तरडगाव (ता फलटण) येथे होईल, येथे वारीतील पहिले उभे रिंगण होईल. मुक्काम तरडगाव (ता. फलटण )येथे होणार आहे. ९ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा आणि विसावा वडजल (ता फलटण) येथे राहील. त्यानंतर रात्रीचा मुक्काम फलटण येथे राहणार आहे. दि. १० जुलै रोजी सकाळी फलटण येथून पालखीचे प्रस्थान होईल.