राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी…; कराडात आ. सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी “राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणाने केले जातील. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा प्रयत्न या आमदारकीच्या माध्यमातून करू,” असे महत्वाचे विधान केले.

यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर आमदार खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. खोत म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी या महाराष्ट्रात सहकाराचा आणि विकासाचा पाया रचला. त्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा दिली. त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि दिशा हे घेऊन भविष्यकाळात पुढे चालण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांचा आमदार झाल्याबद्दल सातारा जिल्ह्याच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांच्या हस्ते सायकर करण्यात आला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.