सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये बाल आणि किशोरवयीन कामगार तसेच रस्त्यावर असलेल्या मुलांमध्ये गुंतलेल्या मुलांना वाचविणे व त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी दि. 1 जून ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत कोणत्याही 15 दिवसांमध्ये ‘बचाव आणि पुर्नवसन मोहिम’आयोजित करण्यात आले आहे.
बाल कामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम 1986 या अधिनियमानुसार 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक कामांवर ठेवण्यास मनाई करतो तसेच बालकांच्या हक्कांचे संरक्षण करतो आणि त्यांना शिक्षणासारख्या मुलभूत गरजांपासून वंचित ठेवणाऱ्या कामांमध्ये गुंतवण्यापासून प्रतिबंध करतो. त्यामुळे आपल्या परिसरात बाल कामगार किंवा रस्त्यावर फिरणारी बालके
चुकीच्या मार्गास लागलेली तसेच अडचणीमध्ये सापडलेल्या बालकांची माहिती चाईल्ड हेल्प लाईन क्र.1098 या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, सातारा -02162-237353 यावर संपर्क साधावा. प्रशासनाकडून आपल्या नावाची ओळख उघड केली जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असे सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.