शेतात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदेंनी…; नाना पटोलेंचा कराडात मुख्यमंत्र्यांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावात आज एक शेतात फेरफटका मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. तसेच “परदेशी कशाला जायाचं गड्या…, असं म्हणत या व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांच्या या प्रकारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. “एकनाथ शिंदेंना नजिकच्या काळात शेतीच करायची आहे. पण सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात. त्याचं भान ठेवा अन् राज्यातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करा,” असा सल्ला देत पटोले यांनी नाना पटोले मुख्यमंत्री शिंदेना टोला लगावला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री सध्या गावी आले असून ते शेती करत असल्याचे दाखवत आहे. मात्र, राज्यात दुष्काळ आहे.

शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकडे त्यांनी लक्ष दिले तर बरे होईल. नंतर तुम्हाला शेतीच करायची आहे. जनतेच्या लोकांचे प्रश्न मांडले विचारले की सत्तेवर असलेल्यांना स्टंट वाटत आहे. ही बाब चुकीची असल्याचे पटोले यांनी शेवटी म्हंटले.

राज्यात कॉंग्रेसला किती जागा मिळतील?

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला जागा मिळण्याबाबत देखील पटोले यांनी महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, कॉंग्रेसने राज्यात एकूण 17 जागांवर निवडणूक लढवली आहे. यातील 16 जागांवर निश्चित कॉंग्रेसला मोठे यश मिळेल. परंतु, एका जागेबाबत घासून निकाल होईल. जर नशिबाने साथ दिल्यास यातही कॉंग्रेसचाच विजय होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

यावेळी नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानस्त बसत असले, तरी काँग्रसने त्यांच्या ध्यानाची धास्ती घेतलेली नाही. भाजपने पेरलली ती अफवा आहे. खरंतर पंतप्रधान म्हणून मोदींचे हे शेवटचेच ध्यान आहे. फक्त सध्या आचारसंहिता असल्याने त्यांचे ध्यान माध्यमांच्या माध्यमातून जगासमोर येवू नये, अशी आमची अपेक्षा असून त्यांना पुढील काळात ध्यानच करत बसायचे आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला विरोध

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडल्याच्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, मनुस्मृती अभ्यासात यावी, या भाजपच्या प्रयत्नाला काँग्रेसचा नेहमीच विरोध असेल. मनुस्मृती हा कालबाह्य ग्रंथ असून अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य संविधान विरोधी असून याचे उत्तर जितेंद्र आव्हाड देतील, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.