आयुष्यभर काँग्रेससोबत राहून चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार आणून ठेवला; साताऱ्यात पटोलेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व ओकशा कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना महत्वाचे विधान केले तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीकाही केली. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा करत पटोले यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले. त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, अशी घणाघाती टीका देखील केली.

सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, धनश्री महाडिक, अॅड. विजयराव कणसे, प्रा. विश्वंभर बाबर, संदीप माने, जगन्नाथ कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपकडून आरक्षणाचा बागुलबुवा केला जात आहे. मराठा आणि ओबीसीत वादाचे बीज भाजपनेच रोवले. आता ते शिखरावर गेले आहे. राज्यातील मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली २०१४ पासून देवेंद्र फडणवीस फसवत आहेत. भाजपमुळेच आरक्षणाला मुठमाती मिळालेली आहे. आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा नुसता गवगवा केला जातोय. यातूनही भाजपने फसविण्याचेच काम केले असून मनोज जरांगे-पाटील आणि समऱ्थकांतही वाद लावला जात आहे. भाजपकडून आरक्षणमुक्त भारतचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही जातगणना करायला
तयार नाहीत.

आज वाढती महागाई, निर्माण झालेली बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी सरकारमधील मंत्र्याकडे द्यायला उत्तर नाही. दिल्लीजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना गोळ्या घालून मारले जात आहे. केंद्र शासनाने केलेले कायदे हे लोकशाही संपष्टात आणण्यासाठीच केले आहेत. पण, देशात आता इंडिया आघाडीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला.