भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला; मंत्री विखे–पाटलांचा नाव न घेता पृथ्वीराजबाबांना टोला

0
966
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे आज कालवा समितीची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. गत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी विश्वासात केला. तत्वाशी संबंध नसणाऱ्या त्रिकूटाने सत्ता स्थापन केली. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.

कोयनानगर येथे कळवा समितीची बैठक झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा तेही राज्याला माहित नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीनंतर त्यांनी केलेले भाष्य योग्य वाटत नाही.

उलट ज्यांनी – ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून सत्ता भोगली त्यांनी आता हात वर केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून तर काँग्रेसची अधोगती सुरू झाली अशी बोचरी टीकाही मंत्री विखे पाटील यांनी केली.