राष्ट्रवादीच्या विजय निश्चय मेळाव्यात पवार गटाच्या नेत्याकडून अजितदादांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. २०१९ साली सोडून गेलेल्या लोकांच्या बाबतीत जे झालं तेच २०२४ साली त्यांच्या बाबतीत होणार आहे. ज्या लोकांना पवार साहेबांनी लाल दिवे दिले त्या लोकांनी नागपूरचे मांडलीकत्व पत्करले. असं म्हणत शरद पवार गटाचे युवा नेते महेबुब शेख यांनी अजित पवारांसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सातारा येथील कोरेगाव येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेख यांनी अजितदादा गटासह बोलत होते. यावेळी शेख पुढे म्हणाले की, बाळू शिंदे साहेब असतील किंवा बाळासाहेब पाटील साहेब असतील हे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

आता पक्ष चोरायची नवी सिस्टीम सुरू झाली आहे, त्यामुळे आमच्या सारख्या युवकाला असे वाटते की राजकारण करायचे की नाही? ज्या लोकांना पवार साहेबांनी मोठे केले ते आपली संस्कृती विसरायला लागले आहेत. साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे याची वाट हे लोक बघायला लागले आहेत, हे शब्द ऐकले की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख होते असं म्हणत आपले राजकारण हे कोणत्या दिशेला जात आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.