भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत माण तालुक्यातील ‘या’ गावाचा डंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने अटल भूजल योजना राबविली जाते. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखणे महत्वाचे असते. अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील किरकसालने प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच यावेळी स्पर्धेत किरकसाल प्रमाणे अनेक गावांनी देखील सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये खटावमधील निढळ आणि मांडवे ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतिय क्रमांक मिळवला. या गावांना ५०, ३० आणि २० लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
२०२२-२३ वर्षासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या १३ जिल्ह्यातील २७० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

एकूण ५५० गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आलेली. स्पर्धेत सातारा जिल्हास्तरावर माण तालुक्यातील किरकसाल ग्रामपंचायत प्रथम आली आहे. तर खटाव तालुक्यातील निढळ ग्रामपंचायत द्वितीय आणि मांडवे ग्रामपंचायतीचा तृतीय क्रमांक आला आहे. या ग्रामपंचायतींना बक्षीस मिळणार आहे.