केंद्रातील BJP सरकार बदलाबाबत कराडात ‘शेकाप’च्या जयंत पाटलांचे मोठे विधान; थेट तारीखचं सांगून टाकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे. त्यानंतर दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील. मी इंडिया आघाडीचा सदस्य आहे म्हणून सांगतोय, असे सूचक विधान शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज कराडात केले.

कराड येथे आज एका कार्यक्रमास शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, जयवंतराव आवळे, माजी आमदार रामहरी रूपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, चार महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार आहे. दिल्लीत असलेल्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला, महाराष्ट्राला होईल, असे पाटील यांनी यावेळी म्हंटले.