सातारा प्रतिनिधी | विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षणाबरोबर त्यांच्या आहाराकडे देखील लक्ष दिले जाते. त्याच्यासाठी दुपारच्या वेळी शालेय आहारदेखील दिला जातो. शालेय पोषण आहार हा मुले शाळेत असताना घेतात. विद्यार्थ्यांना सकस आणि संतुलित आहार मिळावा, हा यामागे उद्देश आहे. तसेच शाळेत मुले येतील हेही यामागील कारण आहे. आता शालेय पोषण आहाराच्या पैशांत वाढ करण्यात आल्याने खिचडी आणखी गोड होणार आहे. १ मेपासून ही सुधारित दरवाढ लागू झाली आहे.
शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. महाराष्ट्रात १९९५ पासून ही योजना राबविण्यात येते. सुरुवातीला या योजनेत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला तीन किलो तांदूळ देण्यात येत होता. २००१ मध्ये न्यायालयाने विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेत अन्न शिजवून द्यावे, असा आदेश दिला. त्यामुळे २००२ पासून योजनेचे स्वरूप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजवलेला आहार देण्यात येत आहे. तर २००८ पासून योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे आता स
केंद्र शासनाने २१ एप्रिल २०२५च्या आदेशाने प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार पोषण आहाराचे सुधारित दर हे १ मेपासून लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी
जुना दर : पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ५ रुपये ४५ पैसे आणि सहावी ते आठवीसाठी ८ रुपये १७ पैसे होता.
नवीन दर : पहिली ते पाचवी – ६ रुपये ७८ पैसे, सहावी ते आठवी – १० रुपये १७ पैसे
प्रतिविद्यार्थी आहाराचे प्रमाण
१ ली ते ५ वी – ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार
६ वी ते ८ वी – ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार
६ प्रतिविद्यार्थी – प्राथमिकसाठी १०० ग्रॅम आणि माध्यमिकसाठी १५० ग्रॅम तांदूळ
जिल्हा परिषद शाळांची माहिती (२०२४-२५ वर्ष)
जावळी : शाळा : २०० शाळा, विद्यार्थी ४,७४७
कराड : शाळा : ३०२, विद्यार्थी : १७,६७७
खंडाळा : शाळा : ११८, विद्यार्थी : ८,५४५
खटाव : शाळा : २४६, विद्यार्थी : ११,२९८
कोरेगाव : शाळा : १८२, विद्यार्थी : ८,७२६
महाबळेश्वर : शाळा : ११३, विद्यार्थी : २,२१८
माण : शाळा : २६८, विद्यार्थी : १०,५९६
पाटण : ५२१, विद्यार्थी : १०,०८३
फलटण : ३०३, विद्यार्थी : १५,२८२
सातारा : २५४, विद्यार्थी : १२,२५९