जिल्हा प्रशासनाच्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या विविध योजनांची व जन कल्याणकारी योजनांची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

लोणंद, ता. खंडाळा येथे आजपासून संवाद वारी उपक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात चित्ररथ, पथनाट्य, कला पथक आणि प्रदर्शन या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. या उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून अनेक वारकरी योजनांची माहिती घेत आहेत.

प्रदर्शनास भेट देत आहेत. विसाव्याच्या वेळेत पथनाट्याच्या माध्यमातून माहिती घेताना दिसत आहेत. या माध्यमातून योजनांची चांगली माहिती मिळत असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत.