राज्यात सर्वप्रथम साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा येथे कोणत्या पक्षाचा कोणता खासदारकीचा उमेदवार असणार? अशी चर्चा सुरु असताना आज सातारा येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातीळ महायुतीसह देशातील मोदी सरकारविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच गावापासून ते शहरापर्यंत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, जनसंपर्क वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आज पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस खा. शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव नरेंद्र देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, पारिजात दळवी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या महायुती सरकारकडून जनतेची कोट्यावधी रुपयाची निधी जाहीर करून प्रत्यक्षात मात्र फसवणूक केली जात आहे. सरकारच्या या दडपशाही विरोधात जनआंदाेलन उभारण्यात येईल. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार गावपातळीवर व्यापक जनाधार निर्माण करणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, त्यांचे संघटन निर्माण करणे, तालुका न्याय कार्यकर्त्यांचे मिळावे भरवणे, मिळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या प्रशिक्षित करणे इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

डॉ. पाटणकरांनी मांडली बैठकीत ‘ही’ महत्वाची भूमिका

साताऱ्यात आज पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठकीस श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी डॉ. पाटणकर यांनी उपस्थित राहत महत्वाची भूमिका मांडली. यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले की, पुनर्वसन आणि सिंचनाचे प्रश्न महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आहेत. धरणग्रस्तांनी गेल्या वर्षभरात मोठ-मोठी जन आंदोलने केली. मात्र, राज्यातले सरकार आंदोलनकर्त्यांची हाक ऐकायला तयार नाही. अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकत्र येऊन एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. या माध्यमातून शोषितांचे आणि वंचितांचे प्रश्न सुटणार असतील तर चळवळीचा भाग बनून शोषितांना न्याय देण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे डॉ. पाटणकर यांनी म्हंटले.