संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला जिल्हा प्रशासनाकडून निरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात दाखल झाला होता. जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम केल्यानंतर धर्मपुरी येथून आज पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान केले. यावेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे आज धर्मपुरी येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत करण्यात आली.

यावेळी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. श्री माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी खूप चांगले काम केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डूडी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

collectar

जिल्हाधिकाऱ्यांनी माऊलीच्या पालखीचे केले सारथ्य

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी राजुरीपासून ते सोलापूर जिल्ह्यच्या सीमेपर्यंत माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. हरी नामाचा गजर करीत पालखीला जिल्हा प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य व सोयी – सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.