कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टींगचे प्रमाण वाढावा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

0
517
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टींगचे प्रमाण वाढवा, असे निर्देश देऊन यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यु होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, ज्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे त्याच्या मृत्युचे ऑडीट करावे. ज्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयांच्या इमारतीची कामे सुरु आहेत ती वेळेत पूर्ण करावीत. यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना चांगले उपचार मिळतील. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरीचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याचा काय परिणाम झाला याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसुतीचे प्रमाणाबरोबर पेशंट तपाणीचे प्रमाणही वाढविले पाहिजे.

तंबाखूजन्य पदार्थांची जिल्ह्यात किती विक्री होते याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून नागरिकांना प्रवृत्त करावे. महाबळेश्वर, जावली, सातारा या तालुक्यांमध्ये कातकरी समाज जास्त आहे. या समाजातील नागरिकांना पीएम जनमन ई-कार्डचे वाटप येत्या 30 जून पर्यंत करावे. जिल्हा आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून त्याच्या मंजुरीचाही पाठपुरावा केला जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.