तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंत तरी चालत गेला का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला. मोदीजींवर बोलनाऱ्यानी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्ही साधे मातोश्री पासून वरळी पर्यंत तरी चालत गेला होता का? असा टोला फडणवीसांनी लगावला. आज कराड येथे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचा संकल्प मेळावा पार पडला यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, आता पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी शिंदे – भाजप सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्हाला तिजोऱ्या भरायच्या असत्या तर आम्ही कधीच भरल्या असत्या. मात्र, आम्ही तसे केले नाही. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून खूप विकास कामे झाली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षात काय विकास कामे झाली हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आता आमच्या सरकारने सत्तेवर आल्यापासून अनेक विकास कामे केली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील बंद पडलेल्या योजना साठी सुधारित प्रस्ताव यावर चर्चा करून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे फडणवीसांनी सागितले.

यावेळी अमर्जित साबळे, आमदार प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, शिवेंद्रसिहराजे भोसले, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, डॉ. सुरेश भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.