साताऱ्याहून मुंबईला जाताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मोटारीला अपघात, आठवले सुखरूप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मोटारीला कंटेनरने धडक दिली. पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुईंज (ता. वाई) हद्दीतील बोगद्यात ही घटना घडली आहे. या अपघातात आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून रामदास आठवले हे सुखरूप आहेत. दुसऱ्या वाहनाने ते मुंबईकडे रवाना झाले.

आठवलेंच्या गाडीचे मोठे नुकसान

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मोटारीने साताऱ्याहून मुंबईकडे जात होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंज (ता. वाई) गावच्या हद्दीतील बोगद्यात त्यांच्या मोटारीला एका कंटेनरने धडक दिली. या अपघातात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. रामदास आठवले हे मात्र सुखरूप आहेत.

दुसऱ्या वाहनाने मुंबईकडे रवाना

अपघातानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे समजताच आरपीआयच्या वर्तुळात खळबळ उडाली. कार्यकर्त्यांनी फोन करून अपघाताची माहिती घेतली. तसेच आठवले साहेब सुखरूप असल्याचे ऐकून कार्यकर्त्यांनी सुटकेचा विश्वास टाकला.