प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती, कीड रोग इत्यादी कारणांने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा नयोजणा कर्णवित केली जाते. पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाने खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरु ठेवली आहे. सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्रे अधिसूचित केली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता रक्कम भरावी लागणार असून उर्वरीत विमा हप्ता केंद्र व राज्य शासन भरणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलै 2024 ही अंतिम मुदत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात काही भागात शेतकऱ्यांकडून पेरणी पूर्ण करण्यात आली असून काही भागात अजूनपेरणीची कामे सुरू आहेत. दरम्यान, अतिवृष्टीच्या काळात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती असते. अशा काळात शेतकरींना पीक विमा मिळावा यासाठी त्याला फक्त 1 रुपये भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ गेतया येतो. भात, ख. ज्वारी, बाजरी, नाचणी, भूईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, व ख. कांदा 9 पिकांसाठी ही योजना लागू आहे.

अनिश्चित हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने तसेच पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक- यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम या योजनेद्वारे होत असल्याने व फक्त एक रुपयांमध्ये योजनेत सहभागी होत येणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तिकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करुन अथवा विमा कंपनीच्या संकेत स्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतील. योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्धआहे.

पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांनी मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

शेतकऱ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा पोस्ट कार्यालय, विमा कंपनी एजंट किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे ३१ जूलै २०२३ पूर्वी हप्ता भरणेविषयीचे तसेच अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.