विहीरीतील इलेक्ट्रीक मोटर चोरणाऱ्या 5 जणांची टोळी तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील सातारा व कराड तालुक्यातील उंब्रज, तळबीड, बोरगांव पोलीस ठाणेहद्दीत विहीरीमधील इलेक्ट्रीक मोटर चोरीचे गुन्हे कारणाऱ्या टोळीतील ५ जणांवर तडीपारीची कारवाई सातारा पोलिसांकडून करण्यात आली आहे.

१) गणेश बाळासाहेब कांबळे, (वय २९, रा. पेरले ता
कराड जि सातारा) (टोळी प्रमुख) २) गणेश महेंद्र चव्हाण, (वय २०, रा. पेरले ता. कराड (टोळी सदस्य), ३) अभय जनार्दन चव्हाण, (वय २१, रा. पेरले ता. कराड) (टोळी सदस्य) ४) आप्पा रघुनाथ सातपुते, (वय २०, रा
पेरले ता कराड) (टोळी सदस्य) ५) सद्दाम शब्बीर अहमद, (वय २९, रा काशीळ मुळगांव धनिया, मोहबाजार, ता. बदलापुर जि जोनपुर राज्य उत्तरप्रदेश) (टोळी सदस्य) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की. सातारा जिल्हयामध्ये विहीरीमधील तसेच नदीकाठावरील इलेक्ट्रीक मोटर चोरी करनाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे दाखल असल्याने उंब्रज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी
सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा
जिल्हयातुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केला. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर यांनी केली होती. यातील टोळी ही सातारा जिल्हयातील शेतकरी लोकांच्या विहीरीमधील तसेच नदीवरील इलेक्ट्रीक मोटरची
चोरी करीत होती त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते.

दरम्यान, त्यांच्यावर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या
प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य
जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीला पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन ११ उपद्रवी टोळयांमधील ३१ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही
सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया
करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, महिला पो. कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.