सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांमधील १३ इसमांवर सातारा पोलीसांच्या वतीने आज दोन वर्षाकरीता तडीपारीची कारवाई करण्यात आली.
सातारा जिल्ह्यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हह्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) रोहीत भिमराव जाधव तसेच टोळी, सदस्य २) राहुल भिमराव जाधव,३) गौरव बाळासो भंडलकर, ४) ऋतिक दत्तात्रय जाधव, ५) विशाल बा्यसोभंडलकर (सर्व रा. सरडे ता फलटण जि सातारा) यांचे टोळीवर फलटण ग्रार्मीण पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, सरकारीकामात अडथळा निर्माण करुन माराहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी मारामारी करणे, दुखापत करुन शिवीगाळदमदाटी करणे असे गंभीर स्वरुपाचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत.
तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) छगन मोहन मदने तसेच टोळी सदस्य २) चेतन शंकर लांडगे ३) काजन नानासो चव्हाण (अ नं १ ते ३ रा सोनगांव बंगला ता फलटण जि सातारा) ४) दिपक दत्तात्रय धायगुडे ५) आदेश सुखदेव जाधव ६) सुरज शिवाजी बोड़रे ७) निलेश सुनिल जाधव ८) विक्रम ऊर्फ आप्पा लालासो जाधव (अ नं ४ ते ८ रा. सरड़े ता. फलटण जि. सातारा) यांचे टोळीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवृन गर्दी मारामारी करणे, द्खापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर स्वरुपाचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत.
वरील परस्पर विरोधी उपद्रवी टोळयां विरुध्दध फलटण ग्रामीण पलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सुनिल महाडीक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५’५ प्रमाणे संपुर्ण सातारा व पुणे जिल्हयातुन दोन वर्ष कालावधीकरीता तडीपारकरण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे कड़े सादर केला होता. सदर प्रस्तावांची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांनी केली होती.
सदर परस्पर विरोधी टोळ्यांतील हदपार इसम हे टोळीने फलटण तालूका परिसरामध्ये सातत्याने गुन्हेगारी कारवाया चालु ठेवत असल्याने त्यांचेवर वेळोवेळी फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिष्टरी दाखल करण्यात आले आहेत. हद्दपार टोळयांतील इसमांचेवर दाखल गुन्हयांमध्ये त्यांना वेळ्योवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्या गुन्हे कराण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही.
त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालका परिसरातील लोकांनामोठया प्रमाणावर या टोळ्यांचा उपद्रव होत होता आशा टोळयांवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर वरील टोळयांमधील इसमांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोव्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा व पुणे जिल्हयातुन दोन वर्षंकालावधीकरीता हह्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोहवा प्रमोद सावंत,अमित सपकाळ, पो. को केतन शिंदे, मपोकों अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोउनि श्री गोपाल बदने, पोहवावैभव सूर्यवंशी यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.